आपण पाहतो अहोत, जगात अदर्श असणारे छ्त्रपती शिवाजी महाराज यांना घडवनार्या राजमाता जिजाउ आईसाहेब या एक स्त्री च होत्या, झाशी ची राणी इंग्रजांशी दोन हाथ करणार्या राणी लक्ष्मीबाई, पहिल्या महिला शिक्षिका सवित्रीबाई फुले, महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटिल, महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, स्त्री सुधाकर व थोर समाज सेविका रमाबाई रानडे, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, भारतीय क्रिकेटपटू मैथीली राज, थोर लेखीका गौरी देशपांडे, जागतीक बॉक्सिंगपटू मेरीकोम, ब्यॉड्मिंटनपटू सायना नेह्वाल आदि यशस्वी स्त्रीया च आहेत.
स्त्री, नारी हि एक व्यक्ति नसुन, शक्ती च एक व्यासपिठ आहे. शांती पासुन ते
उद्रेका पर्यंत सर्व रुपे ही वेगवेगाळ्या परिस्थितित पहायला मिलतात. स्त्री हि
जीतकी सुंदर असते, प्रेमळ असते, मायाळु असते, तरी ती शांत असते, त्याचा कुठेही उद्धार करत नाही, कोणी काही
म्हणाले तर त्याचे मनाला लाउन घेत नाही. तीला खुप जीव लावायची सवय असते, कोणी काहिहि म्हणो, ती तीचे कर्तव्य पुर्ण करत
असते. ती कधीही तिच्या कर्तव्या पासुन मागे हटत नाही.
प्रत्येक पुरुषाच्या जीवनात साडेतीन शक्तिपीठे
असतात. पहिल शक्तिपीठ म्हणजे त्याची आई, दुसर शक्तिपीठ म्हणजे त्याची
बहिण, तिसर शक्तिपीठ म्हणजे त्यची पत्नी आणि आर्धपिठ
म्हणजे त्याची मुलगी. एक त्याला जन्म देते, दुसरी
त्याला माया लावते, तिसरी त्याला जिवनच देते, तर चौथी त्याचा जीव असते. या साडेतीन शक्तिपीठांना प्रेम द्या, माया लावा, त्यांच्या सर्व ईछा पुर्ण करा, त्यांना आनंदी ठेवा, घरात त्यंच्यावर अन्याय
होईल असे कधी वागु नकात, त्यंच्यावर हात उचलणे म्हणजे
आपला पुरुषार्थ नव्हे, तर तिच्यावर उचलण्यात येणार्या
हाताला थांबवन, त्यासाठी केलेले प्रयत्न म्ह्णजे खरा
पुरुषार्थ होय.
घर जरी मेहनत करुन बांधल जात असल तरी, त्या घराला घरपण हे फक्त स्त्री
मुळेच मिळत एवढ मात्र नक्की. घरात आई नसेल तर, घर सुन सुन
वाटत, घरात संस्कार नसतात. घरात
बहीण नसेल तर, बडबड नसते, समारंभ
नसतो. घरात बायको नसेल तर,
संस्कृती नसते, सन नसतात. आणि
मुलगी नसेल तर, घरात किलबिलाट नसतो, उस्तव नसतो. स्त्री हि जीवनातला आनंद आहे. स्त्री हि जीवन जगण्याची एक
उत्तम साथी आहे. स्त्री च्या असण्याने जीवनातील दुखःचे डोंगर सर करायला एक नविन
उर्जा, प्रेरना, शक्ती, आत्मविश्वास निर्माण होतो.
स्त्री ही खूप मायाळू देखील असते, तिच्या मध्ये सहकार्याची भावना
अगदी ठासून भरलेली असते. याच एक उत्तम उदाहरण द्यायचं झाल तर अस की, जर एका ठिकाणी महिलांचा एखादा मोठा समूह असेल तर,
ते त्यांचं काम मनापासून तर करतातच परंतु त्या एकमेकिना सहकार्य देखील करतात. त्या
खूप हळव्या मनाच्या असतात. त्या लगेच कोणत्याही गोष्टीवरून
त्यांचं मत बदलतात कारण त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची वाईट भावना, एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेष नसतो. त्या एकदम सरळ स्वभाव च्या असतात. त्यांना कोणतीही गोष्ट लगेच पटते.
स्त्री ही प्रत्येक कुटुंबाला मिळालेली एक उत्तम
भेट आणि दैवी शक्ति आहे. घरात दिवसभर जे पडेल ते काम करणार, मुलांना खूप चांगले संस्कार करणार, ते आजारी पडले तर प्रसंगी आई परिचारिकेचे काम देखील अगदी चोख पूर्ण करते.
नवर्याला कामात मदत करताना ती कधी त्याची सहकारी होऊन जाते,
कळतही नाही. घरात वयोवृद्ध लोक असतील तर, त्यांची सेवा
करण्यात स्त्री कोणत्याही कामात मागे पुढे बघत नाही, आणि
लाजत देखील नाही. स्त्री ही समस्ये नुसार स्वतः ला अगदी त्या गोष्टीत सामावून घेते, त्या परिस्थितीत स्वतः ला एकरूप करून घेते. प्रत्येक गोष्टीसाठी तिच्या
कडे उत्तम उपाय असतो, ती कठीण परिस्थितीत मार्ग काढायला, कठीण प्रश्नांना सामोरे जायला, स्वतः उत्तर म्हणून
उभी असते. तिला सगळ्यांसाठी स्वतः ला झोकून द्यायला खूप आवडत, तिला सगळ्यांसाठी वेळ असतो, परंतु स्वतः कडे लक्ष
कधीच देत नाही. यात तिला फक्त आपल्या माणसांचं, आणि आपल्या
कुटुंबाच सुख महत्वच असत, घरातली माणसे सुखी आणि आनंदी झाली
की तिलाही आनंद होतो. तिला आनंद देण्यासाठी वेगळं अस काही करायची गरज नसते, तुम्ही फक्त तुमचा आनंद तिला सांगा, तुमचं यश तिला
सांगा ती मनातून खूप आनंदी होते.
स्त्री ही प्रत्येक भूमिकेत राहू शकते. स्त्री
आयुष्यातून गेली तर त्या पुरुषाला सगळं सांभाळून घेण एकवेळ कठीण जात. तो खूप
खाचतो. काही गोष्टी पूर्ण करण्यास असमर्थ ठरतो, पण तेच स्त्री च्या बाबतीत
घडल्यास ती तिची कंबर बांधून सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्यास सज्ज असते. समाजात
असे कितीतरी उदाहरण आहेत की, स्त्री घर सांभाळून बाहेरची
कामे देखील खूप यशस्वी रित्या पूर्ण करते. ती डगमगून जात नाही. ती कनखरपणे उभी
राहते, सगळ्या जबाबदर्या व्यवस्थित पूर्ण करते.
एका स्त्री ला तिचा अभिमान द्या, तिला तिचा मान, सन्मान द्या, तिला कधिही असुरक्षीत वाटू देऊ
नका, या दगदगीच्या जिवनात मिळाला तर थोडा वेळ तिला
द्या. जेव्हा या जगात एक स्त्री मनात कोनतिही भिती न बाळगता फिरेल, तेव्हा खरा स्त्री शक्तिचा झालेला सगळ्यात मोठा सन्मान असेल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा